नाती, नात्यांमधील प्रेम आणि आर्थिक ध्येये या गोष्टींचा गुंता सोडवता सोडवता आयुष्य संपून जाते. आयुष्य म्हणजे काय हे समजण्याची मानसिक तयारी होईपर्यंत मृत्यू आपले हात पसरवून आपल्याला सामावून घेण्यासाठी उभा असतो. जीवनाची सुरुवात होते तेव्हा जीवन म्हणजे काय ते समजत च नाही. आणि जेव्हा अनुभवातून काही शिकू लागतो तेव्हा जीवन हेच आहे असं आपण स्वताला सांगत जातो. प्रत्येक जण एकमेकांना सांगत राहतो कि "हसत राहा" किंवा "काळजी घे." पण हे कुणीच नाही सांगत कि बाळ जीवनात हसायला मिळणार नाही, जीवनात काळजी घेणारे सुद्धा मिळणार नाही, तेव्हा स्वतः असे काही कर कि स्वताचे दुखं स्वतः विसरून हसण्यास समर्थ हो, संकटाना समोर जाण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतः समर्थ हो". कारण आयुष्य म्हणजे फक्त दुखाचा समुद्र असतो जेथे सुखाची लाट आपण शोधत फिरत असतो. एकमेकांना हसायला सांगणारे आपणच रडत असतो.
No comments:
Post a Comment